रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य; ३१ मार्च अंतिम मुदत

भोर : रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब योजनेअंतर्गत शासकीय अनुदानित अन्न धान्याचा लाभ सुरु ठेवण्यासाठी कुटूंबातील रेशनकार्डमध्ये नोंदणी केलेल्या सर्व सदस्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे.

३१ मार्च २०२५ ही अंतिम मुदत असल्याने ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदानित धान्य मिळणार नाही. तसेच, ई-केवायसी न करणाऱ्यांची नावे शिधापत्रिकेतून वगळली जातील. ई-केवायसी पूर्ण न केल्याने अन्नधान्याचा लाभ बंद झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत लाभार्थ्यांची राहील, तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या गावातील रास्तभाव दुकानदारांशी संपर्क करुन तात्काळ ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

Advertisement

भोर तालुक्यातील ४१ हजार नागरिकांचे e-KYC अद्याप अपूर्ण
भोर तालुक्यातील एकूण १ लाख १८ हजार ३३५ पैकी ४१ हजार २४८ नागरिकांचे e-KYC अद्याप पूर्ण झालेले नाही. रेशन कार्डधारकांनी अंतिम तारखेपूर्वी ३१ मार्च २०२५ पर्यंत e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा मोफत धान्याचा लाभ मिळणार नाही. तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page